बरेच वर्ष विचार करत होते ब्लॉग लिहायचा पण राहून जात होत. थोडं टेन्शन आलय कि जमेल की नाही मला
इच्छा खूप होती म्हणून हा एक लिहिण्याचा प्रयत्न.......
लग्नला १३ वर्ष झाली आणि मुलगा हि थोडा मोठा झालाय म्हणून थोडी फार जबाबदारीतून मुक्त झाले, (थोडीफार म्हणते कारण मुलगा लहान उरला नाही बऱयापैकी त्याच तो करतो) , आता वेळ मिळतो स्वतःसाठी, त्यामुळेच कि काय विचारांचं काहूर मनात माजू लागतं मग आपण जातो आपल्या भूतकाळात.
आठवणीच्या समुद्रात आपण पोहायला सुरु करतो , अचानक आपण आपल्या बालपणीच्या आठवणीत जातो. आपण हे करायला पाहिजे होतं तर आपण ते नको करायला हवं होतं आणि बरंच काही......... उगाच वाटायला लागत कि आपण किती बदललोय , आपला स्वभाव किती बदललाय,
मानव हा आयुष्याच्या प्रत्येक टप्पयावर शिकत असतो , त्याच्या अनुभवात भर पडत असते
No comments:
Post a Comment