Thursday 18 June 2020

Depression and Sushant Singh Rajput Suicide

गेल्या दहा दिवसापासून एक बातमी आपल्या मनाला चटका लावते ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत ची आत्महत्या  खरंच दुःखद घटना  :(

गेल्या रविवारी हि बातमी ऐकली आणि shock लागला ,  मनात विचार आला त्याच्या कडे सगळं काही होत तरी त्याने का केली असेल आत्महत्या ? त्याच्या जाण्यानंतर जे काही चालू आहे त्यावरून अस वाटू  लागू लागलय कि इतर लोकं स्वतःची पोळी भाजून घेतात , खरंच किती जणांना दुःख झालय त्याच्या जाण्याने हे देवालाचं माहिती........  

Nepotism हा शब्द सामान्य लोकांनी ह्या सिनेतारकांकडूनचं  ऐकलाय . Nepotism म्हणजे आपल्या लोकांना कामाची संधी देणं , त्यांना पाठिंबा देणं वगैरे आणि ह्या न्युजचॅनेल ह्या सगळ्याची बातमी केली स्वतःच्या फायद्यासाठी. मला सांगा प्रत्येक माणूस हा आपल्या लोकांना पहिली संधी देणार, बरेच असे कलाकार आहेत ज्यांचं कोणीही ह्या क्षेत्रात नसताना स्वतःच्या कुवतीवर प्रसिद्ध झालेत. त्यांनीही हे सहन केला असेल ना , मग आताच का त्याचा बाऊ होतोय ?

सुशांत डिप्रेशन मध्ये होता त्याने आत्महत्या केली, पण देशात रोज लोकं आत्महत्या करत असतील त्या कधी ह्या न्यूज चॅनेल वाल्याना दिसल्याच नाहीत , शेतकरी , कॉर्पोरेट मध्ये काम करणारा , व्यवसाय करणारा सुद्धा. 

मी HR आहे एका नामवंत कंपनीत , गेली दहा वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करते, प्रत्येक वर्षी आम्हाला नव्याने स्वतःला सिद्ध करावं लागत , तुम्ही मागायचा वर्षी  खूप चांगल काम केलं  म्हणून ह्या वर्षी काहीच करावं लागणार नाही असा नाही. त्यात अचानक आपले सिनिअर्स कोण दुसऱ्याला संधी देतात. एवढं काम खूप काम करूनही , टार्गेट अचिएव्हड करूनही काहीच मिळत नाही ना तेव्हा लोक डिप्रेशन मध्ये जातात, फार राग येतो कंपनीचा आणि  स्वतःचा मग पुन्हा नव्याने उभं राहतात पुन्हा आपल काम करायला सुरवात करतात . शेतकरी पण बघा ना तो त्याचे कधीही प्रयत्न सोडत नाही मग काहीही हो 

इथं मुद्दा हा आहे कि सुशांत मनाने खूप खचला होता त्याला मानसिक आजार झाला होता आणि मनाला खंभीर बनवण्याची क्षमता संपली होती म्हणून त्याने हे पाऊल उचलल , सगळ्या क्षेत्रातले लोक हे सहन करतात , मनाला पुन्हा समजावतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. 


Wednesday 10 June 2020

शाळा आणि शिक्षण पद्धती

शाळा आणि शिक्षण पद्धती

वयाच्या ५व्या वर्षीच  आपण आपला  घराबाहेरचा  प्रवास सुरु करतो आणि सुरवात होते ती शाळेपासून........

आजची आणि पूर्वीची शिक्षण प्रणाली हि खूप वेगळी होती. आम्हाला वर्षाला ४ परीक्षा असायच्या, त्यातील २ चाचणी आणि १ सहामाही आणि  १ वार्षिक. त्या सगळ्या परीक्षांची सरासरी म्हणजे आमचा वार्षिक result. खूप अभ्यास करावा लागायचा, पुस्तकात धडे पण खूप असायचेत. शाळेत कळलं नाही तर दुसरा पर्याय म्हणजे ट्युशन क्लास. आमच्यावेळी शाळेत मुलांचं वर्गीकरण त्यांच्या हुशारीवर व्ह्यायच म्हणजे खूप हुशार मुलं हि "अ " वर्गात आणि असं करत शेवटचा वर्ग हा "फ "असायचा. नववी आणि  दहावीत "अ" वर्गाला शाळेशिवाय एक्सट्रा classes असायचेत. ह्याच पद्धतीमुळे  इतर मुलांच्यात आत्मविश्वास कमी असायचा कारण त्यांना कोणी Motivate करणार नव्हत. हे सगळे मी माझ्या अनुभवातून सांगते. 

पण आत्ताच्या मुलांना शाळा सोडून इतर पर्याय मिळालेत अभ्यासाचे,  Youtube, एडुकेशनल अँप्स आहेत. कळलं नाही तर ते पुन्हा पुन्हा बघून शिकू शकतात त्यांचा अभ्यासक्रम पण आमच्या तुलनेत कमी आहे कारण त्यांना प्रोजेक्ट वर्क, Weekly Test असतात म्हणून  त्यांना मार्क मिळवणे सोपं जातं. अलीकडे मी बऱयाच मराठी शाळामध्ये पाहिलंय की अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांचा वेगळा वर्ग केला जातो आणि त्यांच्यावर  अधिक लक्ष दिला जातं. हा मात्र फार मोठा फरक आहे. 

मला असा वाटतं कि सगळ्या शाळेमधून अशा काही टेस्ट घ्यायला हव्यात, त्यात प्रत्येक मुलांची आवड, रुची कशात आहे हे कळलं पाहिजे कारण प्रत्येकामध्ये काही ना काहींत तरी गुण असतातच. नेहमी पेक्षा वेगळी शाळा  असावी. मुले आवडीने शाळेत गेली पाहिजे. शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा  संवाद असायला पाहिजे तो अजूनही नाही,  काही शाळेत असेलही पण साध्या  शाळेत कमी प्रमाणात आहे. 

माझ्या पूर्ण शिक्षणातून मला असा वाटत कि माणूस स्वतःच्या आवडीचं काम खूप मन लावून करतो आणि शाळेतच जर आपण ह्या पिढीला त्यांचे गुण दाखवले तर एक प्रत्येक तरुण आवडीने शाळेत जाईल पण आपण ती मुभा महाविद्यालयीन शिक्षणात दिली  choose  your own stream which is  also  limited.



                                                                        




Saturday 6 June 2020

Pahila Divas ......... as a Blogger



रेच वर्ष विचार करत होते ब्लॉग लिहायचा पण राहून जात होत. थोडं  टेन्शन आलय कि जमेल की नाही मला

इच्छा खूप होती म्हणून हा एक लिहिण्याचा प्रयत्न.......

लग्नला १३ वर्ष झाली आणि मुलगा हि थोडा मोठा झालाय म्हणून थोडी फार  जबाबदारीतून मुक्त झाले, (थोडीफार म्हणते कारण मुलगा लहान उरला नाही बऱयापैकी त्याच तो करतो) , आता वेळ मिळतो स्वतःसाठी, त्यामुळेच कि काय  विचारांचं काहूर मनात माजू लागतं  मग आपण जातो आपल्या भूतकाळात.

आठवणीच्या  समुद्रात आपण पोहायला सुरु करतो , अचानक आपण आपल्या बालपणीच्या आठवणीत जातो. आपण हे करायला पाहिजे होतं तर आपण ते नको करायला हवं होतं  आणि बरंच  काही.........  उगाच वाटायला लागत कि आपण किती बदललोय , आपला स्वभाव किती बदललाय,

मानव हा आयुष्याच्या  प्रत्येक टप्पयावर शिकत असतो , त्याच्या अनुभवात  भर पडत असते









What are the Rules of Intermittent Fasting ?

Everyone has a question that what are the rules of  Intermittent Fasting !! There are some rules to follow for Intermittent Fastin...